ती पाम्बरून गेली
उभं मन पार आज
डोळे जड झालं माझं
वाहून आठवणींचं ओझं ॥
नाय खताची गरज
नको पाऊस कसला
पिरमाचं पीक आलंय मॉप
जव्हा चेहरा त्यो दिसला ॥
डोळे शोधी दिनरात
बनुनी खिल्लारीची जोडी
नांगर टाकलाय कवाच
उरलोय नावापुरता गडी ॥
कुठं चालतोय कळंना
डोळा नेई तिथं जातोय
भैरोबाला नारळ दिलं
तरी पान बी हालंना ॥
कधी पडशील पाऊस ?
माझ्या अंगणी पिरमाचा
आता धीर सुटतंया
जरी म्या भक्त भैरोबाचा ॥
मला वाटली ती सीता
म्हणून धावलो मागून
जव्हा नजरेआड झाली
फिरलो माघारी वैतागून ॥
किती घोर तो लागला
डोळा पाहून थकला
वाट कोरडी ती झाली
आत दुष्काळ जणू पडला ॥
आता जगू कशापायी ?
जीभ जड झाली माझी
गेली हसून दुरून , पार मन पाम्बरून
खोल जखम जी झाली , ती आजही हाय ताजी ॥
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास